प्रदूषण रोखण्यासाठी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात जनजागृती अभियान
इलेक्ट्रॉनिक व्हेइकलचा वापर, रॅली व पथनाट्य सादर करत केली जनजागृती
जळगाव, ता. २० : सध्या जळगाव शहरात धुळीने व हवेच्या प्रदूषणाने अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. याच बाबीचा अंदाज घेत जळगाव शहरातील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या विध्यार्थ्यानी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. महाविध्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी काही दिवसांपासून प्रदूषण रोखण्यासाठी ‘युद्ध प्रदूषण के विरुद्ध’ हे अभियान सुरू केलं आहे. याअंतर्गत धुळीविरुद्ध अभियान सुरू करणं, वृक्षांची लागवड, प्लास्टिकचा वापर टाळणे, इलेक्ट्रॉनिक व्हेइकल पॉलिसी लागू करणं व शेतीतील पालापाचोळा जाळण्याऐवजी जैव विघटनाचं तंत्रज्ञान (Bio Decomposer Technique) वापरणं याचा समावेश आहे. या जनजागृती अभियानाची सुरुवात करत विध्यार्थ्यानी प्रदूषण मुक्तीचे फलक हातात घेत शिरसोली ते जळगाव या रस्त्यावर रॅली काढली तसेच प्रदूषण मुक्ती संदर्भातील पथनाट्य सादर केले व यावेळी वृक्ष लागवड देखील करण्यात आली. या विध्यार्थ्यांना सिव्हील अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. सिद्धार्थ पांडे यांचे मार्गदर्शन लाभले असून या अभियानाच्या पुढील वाटचालीसाठी रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment