आपण पर्यावरणाची काळजी घेतल्यास, निसर्ग आपोआप आपली काळजी घेईल : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात वृक्षारोपणाने 'विश्व पर्यावरण दिन' साजरा ; प्राध्यापकांनी केला प्रत्येक वाढदिवशी वृक्षारोपणाचा संकल्प
यावेळी मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी पर्यावरणाचे महत्व सांगत म्हटले कि, 'एक व्यक्ती एक झाड' ही संकल्पना राबवली पाहिजे. वृक्षारोपण करणे व त्याचे
संगोपन करणे हि काळाची गरज आहे. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण काय करू
शकतो? असा प्रश्न अनेकांना
असेल. तर झाडे लावणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, ऊर्जेची बचत करणे, पाण्याचा योग्य
वापर करणे, पर्यावरणपूरक सवय लावून घेणे व इतरांना पर्यावरणाबद्दल प्रोत्साहित करणे, या काही छोट्या
गोष्टी करून आपण यावर्षीचा पर्यावरण दिन साजरा करू शकतो. असे नमूद त्यांनी यावेळी
नमूद केले.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, मॅकेनिकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील, डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांचे सहकार्य लाभले तसेच यावेळी प्राध्यापकांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व लक्षात घेता स्वताच्या प्रत्येक वाढदिवशी वृक्षारोपणाचा संकल्प करून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली. सदर उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
.jpg)
Comments
Post a Comment